* ज्या डोळ्यांनी तू
प्रतिबिंबांना शरण जातोस त्यांना स्वतःचे रूप पाहायला देखील एका प्रतिबिंबाचीच गरज
असते.
* फुल
म्हणजे एक साक्षात्कार आहे हे समजायला अहंकार विसरावा लागतो.
* प्रतिस्पर्ध्याला समजेल
अशी भाषा वापरण्याचे सामर्थ्य नसेल तर शहाण्याने आपले सत्य खपवायला तिथे जाऊच नये.
* आयुष्याचा एक क्षण जरी उरलेला असला तरी,
पूर्ण सत्य समजले असे म्हणणे उद्धटपणाचे आहे. त्या शेवटच्या
क्षणातही पूर्वकल्पनांचा विध्वंस होऊ शकतो.
- (जी. ए. कुळकर्णी)
No comments:
Post a Comment