Wednesday 13 March 2013

वेचलेली फुले...


जात, धर्म, राष्ट्र, विशिष्ट राजकीय विचारसरणी... अमली पदार्थांसारख्या या अमली संकल्पना किंवा मतप्रणाली भल्याभल्यांच्या बुद्धीभ्रमाला कारणीभूत होताना दिसतात. एकीकडून अशा कुठल्यातरी विचारसरणीचा असर, दुसरीकडून विज्ञानाच्या प्रगतीच्या झेपेतून सतत प्रचंड प्रमाणात वाढत असलेल्या आमच्या गरजा, अशा रेट्यातून माणसाची संवेदनाशक्तीच बोथट होऊ लागली आहे. अशा वेळी प्रश्न आहे तो हा, की सर्वात बुद्धिमान प्राणी जो माणूस, त्याने ‘हा रस्ता अटळ आहे, माझ्या मना बन दगड’ हे सूक्त वाच्यार्थाने घेऊन टणक ‘दगड’ बनत जायचे की ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ हे सूक्त आचरणात आणण्याचा प्रयत्न करून ‘फुलत’ जायचे?

एकट्या मानवजातीचा अपवाद वगळला तर बाकीची सारी चराचर सृष्टी ही एकमेकांत गुंतलेली, एकमेकांच्या सुखदुःखांशी समरस होऊन परस्परावलंबी जीवनचक्रात फेर धरून नाचत, गात जगताना दिसते. या सार्या बंधुभावाशी फटकून वागण्याचा, स्वतः पुढे सारी जीवसृष्टी कस्पटासमान मानून स्वार्थासाठी तिला नमविण्याचा मोह मानवजातीलाच का व्हावा?

प्रत्येक अलौकिकाला शाप हा हवाच का? 

-    (सुनिताताई देशपांडे)

No comments:

Post a Comment