विलक्षण खेळ मांडला होता सेट वर… प्रकाश परावर्तीत करणारे
पत्रे, भले
मोठे आरसे, काचा,
Reflectors … हे
सगळं सुरु होतं महालक्ष्मी च्या ‘फेमस studio’ मध्ये… कारण फिल्म studio हाच चित्रीकरणाचा विषय
होता… अख्खा
सिनेमा एका दिग्दर्शकाच्या जीवनावर बेतला होता... 35mm ...सिनेमास्कोप...कृष्ण-धवल …’कागज के फुल’!! भारतीय सिनेमाच्या
इतिहासात ज्याची milestone म्हणून गणना केली जाते
असा तो ‘कागज
के फुल’… ज्याचा
रिमेक करण्याचा कुणीही फाजील प्रयत्न करू नये असा ‘कागज के फुल’..box
office वर सपशेल
अयशस्वी ठरलेला ‘कागज के फुल’… इतका सुंदर चित्रपट पडण्याचे कारण गुरुदत्त सकट कुणालाही आजवर समजू शकले
नाही असा ‘कागज
के फुल’… सीने
सृष्टीत ठिकठिकाणी भरून राहिलेल्या पोकळपणाची जाणीव करून देणारा ‘कागज के फुल’… गुरुदत्त, अब्रार अल्वी, व्ही. के मूर्ती, एस.डी.बर्मन, कैफी आझमी, गीता दत्त यांसारख्या
दिग्गज कलाकारांच्या अद्भूत प्रतिभास्पर्शाने सजीव झालेला ‘कागज के फुल’!!
या सिनेमा चा opening shot जेव्हा मी प्रथम पाहिला
तेव्हाच गुरुदत्तनी मला खिशात टाकले. त्यानंतर कित्येकदा मी हा चित्रपट
बघितलाय.त्याचे सगळेच सिनेमे असे झपाटून टाकतात... ’कागज के फुल’ मधलं ‘वक्त ने किया क्या हंसी
सितम’ हे
गाणं अप्रतिम आहे… कैफी आझमींचे सुरेख काव्य आणि गीता दत्त चा काळीज चिरून जाणारा आवाज… बहुतेकांनी ते ऐकलं असेल
पण ऐकण्यासोबत हे गाणं पाहावं सुद्धा! या गाण्याचे ज्या प्रकारे चित्रण झालंय तसे
पूर्वी कधीच झाले नव्हते आणि पुढेही होणार नाही..केवळ एकमेवाद्वितीय! अफलातून
प्रयोग होता तो !! फ्रेम च्या एका टोकाला गुरुदत्त उभा आहे तर दुसर्या टोकाला
वहिदा रेहमान… वरून उजेडाचा एक भारदस्त सलग झोत खाली तिरका सोडलाय…दु
रून कॅमेरा दोघांभोवती मूव्ह होतो… आपल्याला पाहताना असे वाटते की आपणच जणू कॅमेरा मूव्ह करतोय…shear
play of lights and shadows !! तीच गत ‘बिछडे सभी बारी बारी..’ या गाण्याची... याचे श्रेय cinematographer व्ही.के मूर्ती यांना
द्यायलाच हवे. अजोड कल्पकता,कलात्मक दृष्टीकोन आणि
प्रयोगशीलता एकत्र आले की सर्वोत्तम कलाकृती निर्माण होते याचे हे उत्तम उदाहरण !!
उगाच नाही गुरूदत्तला ‘क्लासिक’ सिनेमांचा बादशाह म्हणतात.
‘प्यासा’ ची पण अशीच कहाणी... अब्रार अल्विंच्या आयुष्यात आलेल्या खर्याखुर्या ‘गुलाबो’ ची... समाजातला
अप्पलपोटीपणा व ढासळणार्या व्यवस्थेवर ‘प्यासा’ समर्पक भाष्य करतो. वेश्या वस्तीतली भयाणता बघून खिन्नतेने समाजाला ‘जिन्हे नाझ है हिंद पर
वो कहा है..’ असा सवाल करणारा कवी विजय असो की थेटर मधे ‘ये दुनिया अगर मिल भी
जाये तो क्या है’ असे पुकारत एकूणच मतलबी प्रवृत्तीला कंटाळलेला विजय असो... गुरुदत्त ने तो
उत्कृष्ट वठवलाय !! एकंदरीत त्याचे सगळे चित्रपट म्हणजे एक प्रकारची film institute आहे. गुरुदत्त ने
त्याच्या सगळ्या चित्रपटांत पूर्वतयारी व्यतिरिक्त trial and error ची कास धरून कमालीचे
प्रयोग केलेत आणि लोकांना ते दाखवून त्यांना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले. 100mm लेन्स चा क्लोज अप shot साठी त्याने पहिल्यांदा वापर केला. या चित्रपटांमध्ये त्याने उभारलेले
सेट्स…व्ही.के.मूर्ती यांची वाखाणण्याजोगी cinematography …रफी/गीता
दत्त यांच्या आवाजातली कैफी/साहीर यांनी लिहिलेली गीते… एस.डी/ओ.पी.नय्यर/हेमंत
कुमार अशा मातब्बरांनी दिलेले संगीत… बोलावं तेवढं कमीच आहे !! खर्या अर्थाने तो ‘सिनेमाचा’ सुवर्णकाळ होता असे
म्हणावे लागेल.
गुरुदत्त बद्दल बोलायचे झाल्यास ; सारस्वत
कुटुंबात जन्मलेल्या गुरुदत्त ने सीने सृष्टीत येण्या- पूर्वी नृत्याचे
शास्त्रोक्त धडे गिरवले होते. त्यानंतर तो पुण्यात प्रभात फिल्म कंपनीत आला. १९५१
साली त्याने पहिला चित्रपट दिग्दर्शित केला..’बाझी’. नंतर CID वगळता आरपार, जाल, Mr. and Mrs. 55 ,प्यासा, कागज के फुल या
चित्रपटांत दिग्दर्शनासोबत अभिनयही केला. ‘कागज के फुल’ च्या अपयशानंतर गुरुदत्त
पुरता खचला होता. आगामी ‘चौदवी का चांद’ व ‘साहब,बिवी और गुलाम’ या चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने अनुक्रमे सादिक आणि अब्रार अल्वी यांवर
सोपवले... तरीही गुरुदत्तलाच या सिनेमांचा ‘ghost director‘ म्हणतात...कारण प्रत्येक shot वर त्याचे बारीक लक्ष असायचे…’कागज के फुल’ ची कथा त्याच्या
व्यक्तिगत जीवनाशी साधर्म्य दाखवणारी होती. गीता दत्त सारखी गुणवान पत्नी आणि
वहिदा रेहमान सारखी लावण्यवती अभिनेत्री…दोघींमध्ये त्याचं
मन गुंतलेलं…त्यातच तो दुभंगला नी निराशेच्या खोल गर्तेत
गटांगळ्या खात गेला… पण आयुष्याची पुरती ४० वर्षे न बघितलेल्या गुरुदत्त ने रसिकांना अजरामर
चित्रपट दिले. खंत एकच गोष्टीची वाटते की या अभिजात कलावंताच्या जीवनाची अशी
शोकांतिका व्हावी. तो अजून काही वर्षे जगला असता तर आणखी उत्तम असे चित्रपट त्याने
आपल्या पदरात टाकले असते. तरीही तो जे काही करून गेलाय त्यास तोड नाही !!
ध्रुवतार्या सारखं असलेलं त्याचं अढळपद कुणीही हिरावू शकत नाही… कधीच नाही !!
गुरुदत्त सारख्या अभिजात कलाकारांना दाद देताना गुलझार साहेब कायम
असे म्हणतात —
” कितने सच्चे थे वो किरदार
जो पर्दे पर थे;
कितने फर्झी थे वो लोग जो Hall में बैठे थे | “
गुरुदत्त तुला सलाम !!!
No comments:
Post a Comment