हळूहळू मुंबईत अंडरआर्म क्रिकेट
कमीकमी होत गेलं. मराठी मध्यमवर्गीय माणूस संपन्न होत गेला.
तो चाळीतून ब्लॉकमध्ये गेला. चाळी
पाडल्या गेल्या. गल्ल्या गाडय़ांनी भरल्या. क्रिकेट रेडिओ आणि टीव्हीवर एवढं वाढलं की मुलं थेट सिझन चेंडूने
खेळायला लागली. आमच्या वेळी प्रायव्हेट कोचिंग फारसं नव्हतं. साधी
बॅट घ्यायला आमच्याकडे पैसे नसायचे. तर किटचा प्रश्नच नाही. आठ आण्याचा रबरीचेंडू आणण्यासाठी आईच्या मायेला प्रचंड ‘आवाहन’ करायला
लागायचं. वडिलांना ‘वितळवणं’ शक्यच नसायचं. त्यामुळे त्या गल्लीगल्लीतल्या मॅचेस्, तीगर्दी, त्याटाळ्या, कुणीतरी
चिडून पोलिसांना बोलावणं आणि त्या खिडकीमधल्या वैजयंती, साधना, मालासिन्हाही
गेल्या. कधीतरी ‘मुंबईबंद’ च्यावेळी
मोकळ्या रस्त्यावर क्रिकेट उफाळून येतं; पण त्या दिवसापुरतं. त्यामुळे, ‘काचफोडल्यावर’ “स्वत:ला फरूख इंजिनीयर समजता तर शिवाजीपार्कला जाऊन खेळा,” सांगणारे
गल्लीतले बर्वे, कर्वे, चव्हाण, पवारही आता रविवारी दुपारी शांत झोपतात.
मी बऱ्याचदा त्या क्रिकेटच्या
आठवणीने तळमळत असतो.
- (द्वारकानाथ संझगिरी)
No comments:
Post a Comment