माणसं मोठी झाली की लहानपण
विसरतात.
वयाबरोबर त्यांची मनेही प्रौढ
होतात.
तर्काचा जाड भिंगाचा चष्मा लाऊन
ते किलकिल्या डोळ्यांनी जगाकडे बघतात.
मग निंबोणीच्या झाडामागे थकून भागून लपणारा चंद्र त्यांना दिसत नाही.
पाऊस = पाणी = H2O हेच
त्यांना कळते; परंतु श्रावणाच्या नाजूक सरीत चंद्र कसा भिजतो,खोटा पैसा दिला की चिडून पाऊस कसा मोठा होतो हे त्यांना कळू शकत नाही. जादूचे हे सारे जग त्यांना हास्यास्पद वाटते.
- (कविवर्य मंगेश पाडगावकर)
No comments:
Post a Comment